Sunday, March 13, 2011

मुख्तसरसी बात है....................




उगाच दु:ख कवटाळुन बसत नाही कोणी.....
एकांती कधी त्याचीच सोबत असते...
हळुच थोडे सुख लपवून आणते ते कुशीत...
तुझे डोळे, तुझे हास्य, तुझ्या आठवणी......आणि कविता....

प्रत्येक भेटीत असायची हुरहुर.....आज काय नविन....
पण आजकाल फार तोच तोच पणा आला आहे....
नविन स्वप्न नाहीत...
नवी दिशा नाही.....
शुन्यात हरवली वाट...
तिला अंधाराची साथ....
म्हंटलो होतो रागाने... की.. तुझ्या आठवणींवर जगेन....
पण वाटलं नव्हतं....ते इतके अवघड असेल.....

परत भेट कधी.....फ़ार नाही चार शब्द बोलु कधी...
असेच समुद्र किनारी...संध्याकाळी...
जेव्हा सूर्य निळ्या आभाळी रंग भरत असेल...
आणि जाता जाता चित्र नाही आवडलं म्हणून
ओतेल काळा रंग त्या चित्रावर....

पण तु असलीस की होईल ती पौर्णिमेची रात्र...
मऊगार वाळुत चालताना..
प्रत्येक पावलामागे ठेव एक चांदणी त्या आभाळी....
आणि प्रत्येक चांदणीमागे मी ठेवीन एक आठवण ...तुझी ...माझी...
असेच चालत राहु....जोवर हे चित्र पुर्ण होत नाही.. तोवर...

सकळी मग तो सूर्य जळेल आपल्या चित्रावर....
पुसुन टाकेल ते चित्र निळ्या रंगाने....
त्याला काय माहित की...

काही चित्र कायमची मनात कोरली गेली असतात...
"वाळुत मागे उरले पाय" याहीपेक्शा बरीच काही सांगतात....
प्रत्येक रात्री बघीन त्या चांदण्यांकडे
उलगडेल तुझी माझी एक आठवण....
निघून जाईल ती रात्र त्या आठवणीत....
ती रात्र.....अशा अनेक रात्री....दिवस....महिने....वर्षं....

बघ तेवढं जमलं तर.....
तुझ्यासारख्या नक्शत्र देशींच्या लोकांना फार अवघड नाही...
तेवढाच एक जन्म पूर्णत्वास जाईल....
नाहीतर एक कवी उगाच भटकत राहील....



No comments: