Saturday, October 29, 2011

ताजमहालाला वीटा - १

कधी कधी मोह अनावर होतो...........

एक सुंदर उमललेलं गुलाबाचं फूल...
ते तोडायचा मोह होतो...

कल्पनेच्या पलिकडे एखादे सुंदर चित्र
निसर्गाने आपल्या दैवी creativity ने
चितारलेले असते...आणि...
camera च्या सहाय्याने त्या चित्रात
आपण आपले थोबाड चिकटवुन त्या चित्राची
रयाच घालवुन बसतो....

एक सुंदर मुलगी वर्गात येते...
कित्येक ह्र्दयांचे ठोके चुकवते...
तेव्हा उठणारी कळ अगदी हवीहवीशी वाटत असते...
जणु कधी संपूच नये....
आणि हे माहित असुन देखील की ती आपल्या league च्या बाहेर आहे....
आपण शेंबड्यासारखे तिच्याशी बोलायला जातो....

नाटकामध्ये additions घेणाऱ्या कलाकारांबद्द्ल आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते की...
"आम्ही ताजमहाल बांधला आहे, त्याला उगाच कलाकरांनी वीटा लावू नयेत..."

कधी पटतं, कधी खटकतं...
काही photos येतात चांगले....

मुळात निसर्ग काय किंवा ताजमहाल काय किंवा आणखी कोण काय...
सगळेच अलौकिक....
अशा वीटा ते स्वत:मध्ये सामवुन घेतील..
नाहीच आवडल्या तर त्याच फेकून मारतील....

शैलेंद्र ह्यांची माफी मागुन.....
सलिल चौधरी ह्यांची मदत घेऊन...(चालीवर लिहिल आहे ना....)

"दिल कहीं फिसल न जाये इस खयाल से...
के दिल की आरज़ु कदम कदम पे खिल उठें...

दिल तडप तडप के कह रहा हैं आ भी जा...."



Sunday, March 13, 2011

मुख्तसरसी बात है....................




उगाच दु:ख कवटाळुन बसत नाही कोणी.....
एकांती कधी त्याचीच सोबत असते...
हळुच थोडे सुख लपवून आणते ते कुशीत...
तुझे डोळे, तुझे हास्य, तुझ्या आठवणी......आणि कविता....

प्रत्येक भेटीत असायची हुरहुर.....आज काय नविन....
पण आजकाल फार तोच तोच पणा आला आहे....
नविन स्वप्न नाहीत...
नवी दिशा नाही.....
शुन्यात हरवली वाट...
तिला अंधाराची साथ....
म्हंटलो होतो रागाने... की.. तुझ्या आठवणींवर जगेन....
पण वाटलं नव्हतं....ते इतके अवघड असेल.....

परत भेट कधी.....फ़ार नाही चार शब्द बोलु कधी...
असेच समुद्र किनारी...संध्याकाळी...
जेव्हा सूर्य निळ्या आभाळी रंग भरत असेल...
आणि जाता जाता चित्र नाही आवडलं म्हणून
ओतेल काळा रंग त्या चित्रावर....

पण तु असलीस की होईल ती पौर्णिमेची रात्र...
मऊगार वाळुत चालताना..
प्रत्येक पावलामागे ठेव एक चांदणी त्या आभाळी....
आणि प्रत्येक चांदणीमागे मी ठेवीन एक आठवण ...तुझी ...माझी...
असेच चालत राहु....जोवर हे चित्र पुर्ण होत नाही.. तोवर...

सकळी मग तो सूर्य जळेल आपल्या चित्रावर....
पुसुन टाकेल ते चित्र निळ्या रंगाने....
त्याला काय माहित की...

काही चित्र कायमची मनात कोरली गेली असतात...
"वाळुत मागे उरले पाय" याहीपेक्शा बरीच काही सांगतात....
प्रत्येक रात्री बघीन त्या चांदण्यांकडे
उलगडेल तुझी माझी एक आठवण....
निघून जाईल ती रात्र त्या आठवणीत....
ती रात्र.....अशा अनेक रात्री....दिवस....महिने....वर्षं....

बघ तेवढं जमलं तर.....
तुझ्यासारख्या नक्शत्र देशींच्या लोकांना फार अवघड नाही...
तेवढाच एक जन्म पूर्णत्वास जाईल....
नाहीतर एक कवी उगाच भटकत राहील....