कधी कधी मोह अनावर होतो...........
एक सुंदर उमललेलं गुलाबाचं फूल...
ते तोडायचा मोह होतो...
कल्पनेच्या पलिकडे एखादे सुंदर चित्र
निसर्गाने आपल्या दैवी creativity ने
चितारलेले असते...आणि...
camera च्या सहाय्याने त्या चित्रात
आपण आपले थोबाड चिकटवुन त्या चित्राची
रयाच घालवुन बसतो....
एक सुंदर मुलगी वर्गात येते...
कित्येक ह्र्दयांचे ठोके चुकवते...
तेव्हा उठणारी कळ अगदी हवीहवीशी वाटत असते...
जणु कधी संपूच नये....
आणि हे माहित असुन देखील की ती आपल्या league च्या बाहेर आहे....
आपण शेंबड्यासारखे तिच्याशी बोलायला जातो....
नाटकामध्ये additions घेणाऱ्या कलाकारांबद्द्ल आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते की...
"आम्ही ताजमहाल बांधला आहे, त्याला उगाच कलाकरांनी वीटा लावू नयेत..."
कधी पटतं, कधी खटकतं...
काही photos येतात चांगले....
मुळात निसर्ग काय किंवा ताजमहाल काय किंवा आणखी कोण काय...
सगळेच अलौकिक....
अशा वीटा ते स्वत:मध्ये सामवुन घेतील..
नाहीच आवडल्या तर त्याच फेकून मारतील....
शैलेंद्र ह्यांची माफी मागुन.....
सलिल चौधरी ह्यांची मदत घेऊन...(चालीवर लिहिल आहे ना....)
"दिल कहीं फिसल न जाये इस खयाल से...
के दिल की आरज़ु कदम कदम पे खिल उठें...
दिल तडप तडप के कह रहा हैं आ भी जा...."
No comments:
Post a Comment